शिरडीच्या साईबाबांचे व्रत कथा | Sai Baba Vrat Katha PDF In Marathi

‘शिरडीच्या साईबाबांचे व्रत कथा’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Sai Baba Vrat Katha’ using the download button.

साईबाबांचे व्रत कथा – Sai Baba Vrat Katha PDF Free Download

व्रतमाहात्म्य

नऊ गुरुवारचे शिरडीच्या साईबाबांचे व्रत

हे श्रीसाईबाबांप्रीत्यर्थ केले जाणारे एक महाफलदायी श्रेष्ठ व्रत आहे. मनुष्याला नित्याच्या जीवनात अनेक संकटांना, अडचणींना व पेचप्रसंगांना सामोरे जावे लागते.

त्यामुळे मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य, चिंता, क्लेश, उद्वेगे अशा अनेक गोष्टी उद्भवतात. मनःशांती हरपते. या व्रताचरणाने श्रीसाईबाबांची प्रसन्नता लाभून त्या सर्वांचे निवारण होते.

यश, कीर्ती, सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य व आयुरारोग्य लाभते. कटू प्रसंगांना तोंड देण्याचे सामर्थ्य (धैर्य) प्राप्त होते. श्रद्धा वृद्धींगत होते. साईभक्तीची हीच किमया आहे.

शत्रुभय नाहीसे व्हावे, विद्याभ्यासात प्रगती व्हावी, नोकरी मिळावी, लग्न व्हावे, धंदा व्यवसायात गती मिळावी, संकटाचे निवारण व्हावे, सर्व प्रकारची समृद्धी यावी, प्रगती व्हावी, उत्तम संतती लाभावी अशा अनेक इष्टकार्यसिद्धींसाठी हे व्रत केले जाते.

संकटसमयी श्रीसाईबाबांना आर्त हाक मारून या व्रताचा संकल्प केल्यावर त्या संकटातून सुखरुप सुटका झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मात्र संकल्प केल्याप्रमाणे या व्रताचे आचरणही केले पाहिजे, या व्रताचे अनेकांना चमत्कारिक अनुभव आलेले आहेत. या व्रताचरणाने आपलेही कल्याण होईल अशी निष्ठा ठेवा.

श्री साईबाबांची पंचोपचार पूजा

पूजेची पूर्व तयारी –

१) पूजास्थान स्वच्छ करून घ्यावे.

२) जेथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याजागी रांगोळीने स्वस्तिक काढावे. मग पाट (चौरंग) मांडून त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी.

३) पाटावर (चौरंगावर) कोरे पिवळे वस्त्र घालावे.

४) त्यावर श्रीसाईबाबांची तसबीर ठेवावी, तसबिरीतील साईबाबा बसलेले असावेत. ही तसबीर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

५) चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा कुंकुमाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी ठेवावी. डाव्या बाजूस घंटा ठेवावी.

६) चौरंगावर श्रीसाईबाबांच्या तसबिरीसमोर उदबत्ती, निरांजन, पानसुपारी, प्रसादाचा नैवेद्य ठेवण्यास पुरेशी जागा असावी.

(७) पूजेचे साहित्य तबकात आपल्या उजव्या हातास ठेवावे.

८) समई प्रदीप्त करून चौरंगाच्या शेजारी आपल्या डाव्या बाजूस ठेवावी.

९) स्वतःला बसण्यासाठी आसन मांडावे.

त्यावर उपाय म्हणून ती एक आयुर्वेदिक चूर्ण कोमट पाण्याबरोबर नेहमी घेत असे. एके दिवशी ते चूर्ण घेत असताना कोमट पाणी भरलेल्या काचेच्या ग्लासाची काच तडकली आणि त्याच काचेचा एक तुकडा पाण्याबरोबर तिच्या पोटात गेला. त्यामुळे ती खूप घाबरली.

थोड्यावेळाने तिला शोच्यावाटे रक्तसाव होऊ लागला. काही केल्या तो थांबेना. पाहून ते गृहस्थही घाबरले.

पत्नीची अवस्था तर खूपच केविलवाणी झाली होती. आपले काही बरेवाईट तर होणार नाही या विचारांनी तिला मूर्च्छा येऊ लागली.

मध्यरात्रीची वेळ. अशावेळी मदतीसाठी हाक तरी कोणाला मारणार? त्या सद्गृहस्थांनी ‘साईबाबांच्या नऊ गुरुवारच्या व्रताविषयी ऐकले होते. त्या संकटसमयी त्यांना साईबाबांची आठवण झाली.

त्यांनी देव्हाऱ्यातील श्रीसाईंच्या तसबिरीसमोर दिवा लावला आणि श्रीसाईंची प्रार्थना करीत म्हणाले, “महाराज, माझ्यावर कृपा करा. काचेचा तुकडा पोटात गेल्यामुळे माझ्या पत्नीला रक्तस्राव होत आहे तो थांबू द्या.

हे तिच्यावरील प्राणसंकटच आहे. यातून ती सुखरूप राहिली तर मी आपले नऊ गुरुवारचे व्रत विधिपूर्वक आणि श्रद्धेने करीन.”

तर काय आश्चर्य! थोड्या वेळातच त्यांच्या पत्नीचा रक्तस्राव थांबला आणि पोटात गेलेल्या काचेचा तुकडाही शौचावाटे बाहेर पडला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या पत्नीला तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी त्यांच्या पत्नीच्या पोटात कसलीही इजा झालेली नाही असे तपासणीअंती सांगितले.

ते ऐकून त्या गृहस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अल्पावधीत त्यांच्या पत्नीचे आरोग्यही सुधारले. याबद्दल त्या गृहस्थांनी श्रीसाईबाबांनाच धन्यवाद दिले आणि संकल्प केल्याप्रमाणे नऊ गुरुवारचे व्रत मोठ्या श्रद्धेने केले.

केले. पथ्ये पाळली. त्यामुळे त्यांना तेवढ्यापुरते बरे वाटे. काही व्याधी पुन्हा उद्भवे शेवटी त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सला घेतला.

त्यांनी विविध प्रकारच्या चाचण्या व तपासण्या करून त्यांच्या आतड्यात बिघाड असल्यामुळे पोटात दुखते असा निर्वाळा दिला आणि ऑपरेशन करावयास सांगितले.

त्यांच्या सल्ल्यानुसार त्या बाईनी ऑपरेशनही करून घेतले. पण उपयोग झाला नाही. काही खाले, प्यायले तरी खूप त्रास व्हायचा. त्याबद्दल त्यांनी डॉक्टरांना सांगितले असता त्यांनी त्यांना आणखी एक ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले.

त्यामुळे त्या बाई घाबरल्या. ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम कोठून आणायची हाही प्रश्न होताच. तेव्हा त्यांची चिंता जाणून एका मैत्रिणीने त्यांना ‘श्रीसाईबाबांचे नऊ गुरुवारचे व्रत’ करा म्हणजे साईकृपेने तुम्हाला नक्की बरे वाटेल असे सांगितले.

त्याप्रमारे त्या बाईनी श्रीसाईचे ते व्रत यथाविधी मोठ्या श्रद्धेने केले. व्रतोपासनेच्या काळात उदबत्तीचे पडणारे भस्म त्या बाबांची उदी म्हणून श्रद्धेने आपल्या पोटास चोळत असत.

त्यांची निष्ठा फळास आली आणि व्रत पूर्ण होण्याच्या आधीच त्याच्या व्याधीस लक्षणीय उतार पडला. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ते व्रत यथासांग करून उद्यापनही केले.

अशा प्रकारे अनेक सद्भक्तांना शिरडीच्या श्रीसाईबाबांच्या या नऊ गुरुवारच्या व्रताचे चमत्कारीक अनुभव आलेले आहेत. या व्रताचे सद्भावाने आचरण केल्यामुळे अनेकांची संकटातून सुटका झाली आहे.

अनेकांना आरोग्य लाभले आहे. अनेकांची अडलेली कामे मार्गी लागली आहेत. अनेकांच्या जीवनात सुख, शांती व स्थैर्य आलेले आहे.

Author
Language Marathi
No. of Pages9
PDF Size1.4 MB
CategoryVrat Katha

और पढ़े:

Sai Baba Vrat Katha PDF In Hindi

Sai Baba Vrat Katha PDF In English

साईबाबांचे व्रत – Sai Baba Vrat Katha Book PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!